एत्तदेशीय अस्सल मराठमोळे संपादक जे की फक्त कंपाऊंड वर भरोसा ठेवतात ते आपल्या कार्यालयात who ला कस गंडवायच याचा विचार करत बसलेले असतानाच आम्ही त्यांना गाठले.
साहेब जै महाराष्ट्र.
साहेबांनी नाखुशीनेच बोला अस म्हटले
मी: मराठी पाऊलाने जागतिक राजकारणात प्रवेश केल्याबद्दल फार्फार अभिमान वाटला म्हणून अभिनंदन करायला आलोय.
साहेब : ठिकाय ठिकाय..अजून काही
मी : शेरो शायरी पण मस्त जमते बघा तुम्हाला.
साहेब : करावी लागते काय करणार.
(साहेबांनी खुश होउन चहा मागवला )
मी : ते विरोधी पक्ष CBI चौकशी....
साहेबानी थांबवत म्हटले
काय कळत हो त्या सीबीआयला. त्यापेक्षा आपले लोक चांगले आहेत.
मी : ते खर आहे पण. न्यायालय ...
साहेब : मी तेथील स्टेनो ला जास्त महत्व देतो.
मी : क्या बात है! कसला भारी आत्मविश्वास आहे साहेब तुमचा.
(साहेब भलतेच खुश झाले. )
साहेब : अरे मग सर्कार उगाच चालवतो की काय....
मी : पण ते तर काका चालवतात ना.....
साहेब : मी त्यांच्या पी ए ला जास्त महत्व देतो.
मी : हे १००% बरोबर हा साहेब.
साहेब : माझा अग्रलेख वाचत जा म्हणजे असे कंफ्युज होणार नाहीस.
मनातल्या मनात मी : (साहेब मी पण प्रेस मध्ये काम करणाऱ्या वर्करला जास्त महत्व देतो. )
साहेब : बाकी राज्याची काही खबरबात
मी : ते एस टी ला पास लागत नाही अन खासगी वाहनाला....
साहेब : एवढ कस कळत नाय तुला. लॉकडाऊन ने लोक कंटाळलेत. खासगी वाहनाने जाताना लोकाना पुन्हा कोंडल्यासारखे वाटेल. एस. टी गेल्यावर लोक थोडे मोकळेपणाने बोलतील. गप्पागोष्टी करतील.
मी : पण ते वायरस
साहेब : तुला माहित आहे ना. मराठी माणुस WhO ला मार्गदर्शन करतो. ते वायरस वगैरे काय पण करु शकत नाही एस. टी. ला.
एस. टी जेव्हा राज्यातील रस्त्यावरील आदळत आदळत जाईल तेव्हा शरिरातील सर्व पेशी अंगभर वेगाने फिरु लागतील. त्यामुळे विषाणू आपोआप नष्ट होउन जातील. शासोच्छवास तीव्र गतीने झाला तर भस्त्रिका हा प्राणायाम होउन जातो. त्यामुळे मला तर वाटते आपण प्रत्येक नागरिकाला एस. टी प्रवास सक्तीचा करायला पाहिजे. म्हणजे सर्व राज्यातील रस्त्यावर केवळ एस टी च. सॅटेलाइट ने बघितले की केवळ एस टी च
साहेबांच्या कल्पना शक्तीचा विकास करत एस टी त प्रवास करत होते अन मला त्यात कुठेही सोबत जायचे नव्हते म्हणून मी साहेबांना अजिबात अडथळा न करता कार्यालयाच्या बाहेर पडलो.
: आपलाच
1 comment:
Sueprb Article.
https://mazisamruddhi.blogspot.com
Post a Comment